आठवण
आठवांच्या सांजवेळी
पापण्यांनी केली मुजोरी
एक एक आठवणींच्या ,
गर्तेत नेत नेत ,
स्वप्नांची शिदोरी ,मला सतावी बावरी ..........
नको हि मला ,
छळवणूक तिन्ही त्रिकाळी ,
हि सरत गेलेली रात्र ,
का एवढी वाढली ह्या पावसाळी...........
नात्याची नव्हाळी ,
कधीचीच हरवली ,
शोधता शोधता ,
जन्म हि संपेल ,
पण आता दिसणार नाही ........
का वादळाशी मैत्री करावी ,
माहित आहे जन्म संपेल
वादळे संपणार नाहीत..........
No comments:
Post a Comment