गणपती विसर्जना नंतरचा
टिळकांनी सार्वजनिक गणेशोस्तव लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरु केला .हे सर्वांना माहित
आहे हा इतिहास परत काय सांगत आहे असे वाटेल पण नुसते गणपती बसवणे नव्हे तर
एकता निर्माण करणे तसेच जनजागृत हा एक उद्देश होता...पण आता त्याचे स्वरूप काय तर
दहा दिवस धांगड धिंगा मोठ्याने गाणे त्यातही चिकणी चमेली सोबत शीला जोरात वाजते ..
असे हे कानठळ्या वाजवीत लोकांचे मनोरंजन अभिप्रेत नवते टिळकांना ...
आता समारोपाची वेळ आलीय..त्यातही काही वेगळे असे दृश्य नाही .जोराने ब्यांड
वाजवीत नाचत गात नेऊन सरळ नदीत शिरवणे पाहत बसेल प्रशासन आपले काय?
मनात आणले तर आपणच हे सर्व काही वेगळे करू शकतो ..बघा कसे मातीचा गणपती
असेल तर घराचा घरी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन विधिवत त्यात तुम्ही मूर्ती
विसर्जित करू शकतो ...पण ती मूर्ती प्लास्टर ऑफ परीस ची नसायला पाहिजे .
काय कि ती माती घरच्या झाड्डांना उपयोगात येईल ...निर्म्माल्ल्या एका खड्ड्यात
पुरून त्यावर माती टाकून ठेवल्यास चांगले खत मिळेल..
नुसता डीजे लावून नाचून आपण मोडर्ण आहोत असे भासवण्या पेक्षा आपण
निसर्गाची काळजी घेतो हे समाधान औरच आहे ...गावातील मोठे गणपती जेव्हा नदी
मध्ये तसेच शहरात समुद्रात विसर्जित करतात त्यावेळी कोणीही हा विचार का नाहीत कि
मूर्तीवरील कृत्रिम रंगाने पाण्यात प्रदूषण होत आहे..जर याकडे लक्ष दिले तर हजारो जीव
जे या प्रदूषणामुळे मारतात ते तुम्हाला दुआ देतील. नुसते पाण्यातील मासे, बेडूक, कासव
चा नाही तर दुषित पाणी पिल्याने ज्या जनावरांना विषबाधा होते ते सुद्धा .....आमचा इथे
एक इथे नेचर ग्रुप आहे जो सर्व निर्म्मल्या कचरा मोठ्या कचरा पेटीत टाकण्याचे सतत
आवाहन करीत असतो..त्यावर एक फिल्म सुद्धा बनवली आहे जी कार्यक्रमात दाखवतो .
तसा सर्वांनी एक ग्रुप बनवून आपल्या निसर्गाची काळजी घेतली तर..हा एक स्तुत्त्य
उपक्रम ठरेल... जसे तुम्ही चांगले फोटोग्राफर असाल तर पाण्यात गणपतीचे काय हाल
होतात,कचऱ्याचे ढीग जमा होवून कसे प्रदुषण करतात याचे फोटो काढून जनजागृती
करू शकता..उद्देश हा कि लोकांमध्ये थोडा अवेरनेस यावा...
...सुरेखा..
No comments:
Post a Comment