माझी मी
कधीतरी असे वाटते .............
क्षणात विझावे एक अंधार बनून ......
काळोखाच्या झुल्यात झुलत राहावे ...
एक चैन म्हणून,
जीवाचा विरंगुळा म्हणून ......
कधीतरी असे वाटते..........
हसावे.....?नाही रडावेच ,
आसवांच्या पुरात जावे ......
धो धो करीत संपून जावे
हलके हलके होऊन जावे .....
भावनांची वादळे नकोत म्हणून ,
दुखाचा निचरा व्हावा म्हणून ............
कधीतरी असे वाटते .............
ह्या मनाला बरं वाटावं ,
पानांशी गुजगोष्टी कराव्यात.....
फुलांशी हितगुज करावं,
वाहत्या नदीला थांबवावं.....
उद्धाम वाऱ्याला रागवावं,
आकाशाशी मस्ती करणाऱ्या,
वाळक्या पानागत क्षणात हलकं व्हावं ....
आभाळागत व्हावं म्हणून ...
जीवाला बरं वाटावं म्हणून.......
No comments:
Post a Comment